चतुरस्त्र लेखक, पत्रकार व नाटककार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा जन्म १८७९ मध्ये झाला. चरित्रपर नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी, चांदबीबी) हा नवा प्रकार त्यांनी हाताळला. १९१५ साली त्यांनी काढलेल्या “संदेश” ने मराठी वृत्तपत्रांना आधुनिक रुप दिले. १० नाटके, दोन कादंबर्या व दोन कथासंग्रह त्यांनी लिहिले होते.